अनाहत सत्य
भाग 3
मिठ्ठुने थोड्याच वेळात प्रोफेसर आणि निर्मिती यांच्यासाठी जेवण आणलं आणि त्याचबरोबर सोबतीला एका मुलाला घेऊन आला. दोघांनी मिळून खोलीच्या मध्ये बांबूच्या सहाय्याने आडोसा केला. त्यामुळे आता त्या एका खोलीचे दोन भाग झाले होते. निर्मितीने शांतपणे तिचं समान उचललं आणि ती आतल्या बाजूला गेली. कपडे बदलून आणि जेवून घेऊन प्रोफेसर राणे आणि निर्मिती आडवे झाले. वयापरत्वे आणि झालेल्या दगदगीमुळे प्रोफेसरना लगेच झोप लागली. झोपडीच्या बाहेरून वेगवेगळे प्राण्यांचे आणि किड्यांचे आवाज येत होते. बदललेली जागा आणि दुसऱ्या दिवशी सुरु करायच्या कामाबद्दलची उत्सुकता यामुळे निर्मितीला दमली असूनही झोप येत नव्हती. तिच्या मनात विचारांची आवर्तन उठत होती.
'सर इथे गेले काही महिने येत आहेत. तरीही त्यांच्या मते फारशी प्रगती नाही झालेली. अस का बरं? सरांच्या अनुभवाचा विचार करता अजून काही मिळत नसूनही ते इथे येत आहेत म्हणजे नक्कीच त्या मंदिरात काहीतरी आहे.' विचार करता-करता निर्मितीच्या लक्षात आलं की ते मंदिर कोणत्या देवतेचं आहे किंवा कोणत्या काळातलं आहे; याबद्दल आपल्याला सरांनी काहीच सांगितलं नाही. मग तिच्या लक्षात आलं की मुद्दामच सरांनी तिला फारशी माहिती दिली नव्हती; आणि तसं त्यांनी इथे पोहोचल्यावर तिला सांगितलं होतं.
प्रोफेसर गाढ झोपले हे त्यांच्या लयीत घोरण्यावरून निर्मितीच्या लक्षात आलं आणि ती हळूच उठून दार उघडून बाहेर आली. बाहेरच्या सुंदर, शांत आणि रात्रीच्या निसर्गाने आच्छादित आकाशाकड निर्मितीचीे नजर गेली आणि ती मंत्रमुग्ध होऊन त्या शुभ्र आकाशगंगेकडे बघत उभी राहिली.
"आस्मान से चांदी बरस रही है ना बीबीजी?"
मिठठू निर्मितीच्या शेजारी कधी येऊन उभा राहिला होता ते तिला कळलंच नव्हतं. त्यामुळे त्याच्या आवाजाने ती एकदम दचकली आणि मग हसून तिने मान डोलावली. "मिठठू मै भी एक गांव मे ही पली बडी हूं. फिर भी मैने इतना सुंदर आस्मान कभी नही देखा." मिठठू हलकस हसला आणि त्याने तिला सोबत चलण्याची खुण केली आणि तो तिच्याकडे पाठ करून लगोलग चालू पडला. एकदा मागे वळून बघून मग निर्मिती देखील तिच्यामागून निघाली. फर्लांगभर चालून गेल्यावर तिच्या लक्षात आलं की रस्त्याला थोडा चढ आहे. तिचा श्वास फुलायला लागला... आणि अचानक मिठठू थांबला. तो थांबला म्हणून ती देखील थांबली. रात्रीची वेळ आणि अनोळखी प्रदेश असल्याने निर्मिती पूर्ण वेळ खाली बघत चालत होती. थांबल्यावर तिची नजर मिठठूकडे वळली. तो समोर एकटक बघत होता... आणि रात्रीची वेळ असूनही आणि मिठठू सावळा असूनही त्याच्या चेहेऱ्यावरचे मंत्रमुग्ध भाव तिला दिसले... रात्रीच्या वेळी मिठठूच्या चेहेऱ्यावरचे भाव दिसले... तिचं तिलाच हसू आलं तिच्या मनातल्या वाक्याचं. पण ते किती खरं आहे हे देखील तिला समोरच दिसत होतं. अर्ध्या सेकंदामध्ये आलेले हे सगळे विचार तिच्या मन:पटलावरून एका क्षणात पुसले गेले; कारण जिथे मिठठू बघत होता तिथे तिची नजर वळली होती.
समोर लाल, निळ्या, पिवळ्या आणि पांढरऱ्या नाजूक लहान दिव्यांच्या उजेडाने एक मोठ्ठ झाड... कदाचित वडाच असावं.... भरून गेलं होतं. ते दिवे इथे तिथे उडत होते पण झाडापासून लांब जात नव्हते. त्यामुळे टेकाडावरचं ते झाड झमझम चमकत होतं. त्या उजेडाने आजूबाजूचा परिसर व्यापून गेला होता. तोच उजेड मिठठूच्या चेहेऱ्यावर पडला होता.
"मिठठू... इस कुदरत की कमाल का वर्णन मै नही कर सकती. स्वर्ग तो यही है." निर्मिती स्थिर नजरेने त्या झाडाचं सौंदर्य मनात आणि डोळ्यात साठवत म्हणाली.
"बीबीजी, ये तो कूच भी नही है. आप जो मंदिर देखने आई हो... ऊस मंदिर के पास पोहोचते पोहोचते तो आप होश ही गवा बैठोगी. आप कुदरत का जो रूप यहा देखोगी वो कही और आप नही देख पाओगी. वैसे मैने पढा है के आस्ट्रेलिया मे भी गहरे जंगल है. लेकिन फिर भी इधर की बात कूच और है. ये मेरा प्यार नही बोल रहा है बिबीजी... यह सच्चाई है. जो इतिहास भारत का है; विशेषतः इस भगवान की भूमी का है; वह इतिहास आप को पुरी धरती पर कही नही मिलेगा. मैने पढा है के हमारे पूर्वज... मतलब होमो सेपियन्स, जो केवल बंदर की उत्पत्ती नही थे, तो किसी और दो जानवरो के संगम से बने थे; वह पैसठ हजार वर्ष पाहिले, आफ्रिका से भारतीय उपमहाद्वीप पाहुचे थे. वह पुरे भारत मे विविध क्षेत्रोमे बखर गए. जो होमो सेपियन्स यहा आए वो एक काल के बाद जैसे गायब हो गए. मात्र जो सिंधू घाटी मे, दक्षिण एशिया मे विकसित हुवे उहोने धीरे धिरे अपनी संस्कृती विकसित की. और फिर गावं और शहर की और हम चल पडे. धिरे धिरे मकान, कपडा... फिर लकडे का इस्तमाल... फिर धातू.. फिर हम तन कपडेसे ढकने लगे. फिर आई बोलने - खाने - पीने की संस्कृती. और फिर हमने.... मतलब के होमो सेपियन्स ने कभी मूड के नहीं देखा. बस प्रगती करते ही चले गये.
ऐसी संस्कृती फिर धरती के और भी भागो मे विकसित होती गयी. और फिर धिरे धिरे... बिबीजी... जैसे आप ये भूल गये हो के मैने कहा के जो होमो सेपियन्स यहा आये वो गायाब हो गये... वैसेही वो प्रगतीके नाम पे जो आगे निकल गये वो ये भूल गये की इन जंगलो मे भी उनके भाई आये थे. और अब वो नही है."
त्याचं बोलणं मन लावून ऐकताना त्याला माहीत असणाऱ्या माहितीचं मनात आश्चर्य करणारी निर्मिती त्याच्या शेवटच्या वाक्याने एकदम चमकली. त्याने केलेला उल्लेख तो बोलत असताना लक्षात आला असूनही पुढच्या त्याच्या बोलण्याच्या ओघात आपल्या मनातून एकदम निघूनच गेला की. मिठठूने आठवण करून दिल्या नंतर तिच्या लक्षात आलं ते!
त्याचा हात धरून त्याला एका दगडावर बसवत ती देखील खाली बसली. त्याच्याकडे एक टक बघत होती निर्मिती. "मिठठू... तुम्हारे मन मे एक अलग ही घुस्सा है ना? कूच केहेना तो चाहते हो लेकिन हर वक्त खुद को खिंच ले रहे हो न?" त्याच्या हातावर थोपटत निर्मिती म्हणाली. आजूबाजूला तसा अंधार होता. दूरवर चमकणारं ते जादुई झाड आणि आकाश गंगेतून बरसणारा तो चंदेरी प्रकाश! रातकिड्यांची आणि त्याच सोबत असंख्य अशा किड्यांची आणि न जाणे कोणकोणत्या जनावरांच्या आवाजाची भर... पण त्याक्षणी निर्मितीला हे काहीही जाणवत नव्हतं. त्या धूसर उजेडात मिठठूच्या चेहेऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न ती करत होती.
"दिदी, घुस्सा नहीं है, दुख है." अत्यंत स्थिर आवाजात मिठठू म्हणाला.
"कसलं दुःख?" निर्मितीने ओल्या आवाजात पण नकळतपणे मराठीत त्याला प्रश्न केला.
"दिदी, हे जंगल आणि इथे राहाणारे हे आदिवासी... यांना so called शहरी लोक विसरून गेले आहात; हे दुर्दैवाने सत्य आहे. ज्यांना आमच्याबद्दल काही भावना आहेत; त्या म्हणजे फक्त अशिक्षित, जंगली लोक अशाच आहेत. पण दिदी, कोणाच्याही मनात हे नाही आलं की आम्ही अजूनही हे असं इथे जंगलांमध्ये प्रगती पासून दूर स्वतःच्या इच्छेने राहात असू का?" मिठठू बोलत होता. त्याच्या अस्खलित मराठी बोलण्याचं आश्चर्य वाटून घ्यायचं की त्याच्या वयाहूनही जास्त समंजसपणे बोलण्याचं हे निर्मितीच्या लक्षात येत नव्हतं.
निर्मिती काही बोलायच्या अगोदरच मिठठूने तिला थांब अशी खुण केली आणि पुढे बोलायला लागला...
"दिदी, इस जंगल का अपना ही एक राज है. आपले असे नियम आहेत; कायदे आहेत; आणि त्याहूनही जास्त असं स्वतःला जपणं आहे. इथल्या मनुष्य प्राण्याला आता बाहेर काय चालू आहे; ते कळतंय. त्याबद्दल त्याला उत्सुकता आहे; वेगळया प्रगत जीवनाची इच्छा आहे आणि तरीही इथला आदिवासी इथे त्याच्या जन्म जागी... या जंगलाला बदलायला तयार नाही. क्योंकी हमे हमारे बचपनसे एक ही बात समजाई गयी है; के ये जो जंगल की संस्कृती है उसे किसीं भी प्रगत संस्कृती से बचाकर रखना यह हमरा प्रथम कर्तव्य आहे. और आप को क्या लगता है किसने समजाया है हर आदिवासी को ये? दिदी, आमच्या आई-बापाने नाही; याच जंगलाने संगीतल आहे. फक्त आम्हालाच नाही; तर प्रत्येक पिढीला गेली हजारो वर्षं हे माहीत आहे. अर्थात तरीही असे अनेक आहेत की जे हे समजावणं मान्य करत नाहीत... पण मग त्यांच्या बाबतीत हे जंगल देखील योग्य तो निर्णय घेतंच."
मिठठूचं बोलणं ऐकून निर्मिती आश्चर्यचकित तर झालीच पण त्याहूनही जास्त गोंधळून गेली. त्याच्याकडे बघत आणि त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत निर्मिती म्हणाली; "मिठठू, तू नक्की काय सांगतो आहेस? अरे तू स्वतः शिक्षण घेतो आहेस. तूच स्वतः सरांना फोन करून इथे बोलावलं आहेस; गूढ उकलण्यासाठी. आणि तरीही तू म्हणतो आहेस की इथे या जंगलांमध्ये प्रगतनशीलता स्वीकारली जात नाही. ते ही केवळ हे जंगल तुम्हाला तसं सांगत म्हणून? मला काहीच कळत नाही आहे."
"दिदी, शिक्षण घेणं चुकीचं नाहीच. मात्र ते कशा प्रकारे वापरावं हे समजणं जास्त महत्वाचं असतं; हे आम्हाला या जंगलाने समजावलं. तुम्ही बरोबर बोललात! मी स्वतः शिक्षण घेतो आहे... मीच सरांना इथे बोलावलं आहे... याच शिक्षणामुळे मला हे समजलं की आदिवासी लोकांना हे प्रगत जग एका वेगळ्या नजरेने बघतं. आम्ही नाकारलेली जमात आहोत... मनुष्यप्राण्यांमध्ये. तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणून सांगतो... ज्या प्रमाणे अनेक युरोपियन देशांमध्ये अजूनही भारत म्हंटलं की केवळ जंगलाने अच्छादलेला प्रदेश आणि जादूटोणा - करणी करणारे लोक असं वाटतं न; तसा विचार अनेक शहरातील लोक आमच्याबद्दल करतात. हा विचार बदलावा यासाठी आम्ही शिक्षण घेतो... आमच्या बद्दलचे हे चुकीचे समज बदलण्यासाठी आम्हाला तुमच्यामध्ये येऊन राहाण आवश्यक आहे; आणि हेच कारण आहे की मी सरांना इथे बोलावलं आहे. आम्ही दुष्ट नाही; जादूटोणा करणारे देखील नाही; आमच्यामध्ये अजूनही काही जमाती नरभक्षक असतीलही; पण म्हणून आम्ही सगळेच तसे नाही. हे जर इथे येऊन सरांनी स्वतः बघितलं आणि मग पुढच्या प्रत्येक कॉन्फरन्समध्ये सांगितलं तर कदाचित आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल." मिठठू बोलत होता आणि निर्मिती समजून घेत होती.
मिठठू बोलायचा थांबला आणि काही क्षणांनी निर्मिती उठून उभी राहिली आणि म्हणाली; "मिठठू, तू आत्ता मला जे सांगितलं आहेस त्याहूनही खूप जास्त असं काहीतरी आहे; हे मला जाणवतं आहे. पण मला हे देखील कळून चुकलं आहे की तू मला ते सांगणार नाहीस. त्यामुळे मी आग्रह देखील धरणार नाही. बरं, चल परत फिरू. खूप रात्र झाली आहे आणि उद्या आपल्याला बराच प्रवास आहे."
तिच्या सोबत उठून उभा राहात मिठठू म्हणाला; "दिदी, मला जितकं सांगायची परवानगी होती त्याहूनही जास्त मी बोलून गेलो आहे. त्यामुळे आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे होईल ते पहाणं हेच योग्य आहे. चला; तुम्हाला सोडून मी देखील काही वेळ विश्रांती घेतो."
निर्मिती मिठठू सोबत परत निघाली. पण इथे येताना तिची असलेली मनस्थिती आणि परत फिरताना लागलेली विचारांची तंद्री यात जमीन अस्मानाचा फरक होता.... परत एकदा चंदेरी आकाशगंगेकडे बघून तिने तिच्या कुटीचा दरवाजा उघडला आणि ती आत शिरली.
क्रमशः
No comments:
Post a Comment