काही आठवणी कायम मनात राहातात.
माणसाचं मन म्हणजे अनेक भावनांचं, विचार-कल्पनांचं आणि मुख्य म्हणजे अनेक आठवणींचं भांडार असतं. कडू-गोड, दुःखद-आनंदी असे अनेक प्रसंग आपण आपल्याही नकळत आपल्या मनात जपत असतो; आणि कधीतरी काही कारणांनी हेच प्रसंग आठवणींच्या स्वरूपात परत ताजे करतो.
कशी गम्मत असते बघा.... आपल्या वाढत्या वयात आपल्याला आई-वडिलांची मतं कधीकधी पटत नाहीत. मग आपण वाद घालतो... माझं म्हणणं कसं बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी कधी त्यांचा राग येतो; तर कधीतरी त्यांचं पटत. पण तरीही आई-वडिलांनी विषय समजावताना बोललेले शब्द आपल्या मनात घर करतात आणि आपण मनातच म्हणतो;'माझ्या मुलांच्या बाबतीत मी नाही अस वागणार.' दिवस जातात... आपण मोठे होतो... संसार-मुलं अस आयुष्य आपलं देखील सुरू होतं.... कधीतरी असा प्रसंग येतो की आपली वयात येणारी मुलं आपल्याशी वाद घालायला लागतात; आणि नकळत आपण आपल्या आई-वडिलांनी वापरलेले शब्दच वापरतो. वाद मिटतो.... पण ती जुनी आठवण मनाच्या पृष्ठभागावर येते. चूक की बरोबर याच्या पुढे जाऊन मला वाटतं की ती आठवण... तो प्रसंग.... कदाचित त्या वयात आपल्याला फार शिकवत नसेलही. पण पालकत्वाच्या या वळणावर मात्र तोच आठवणीतला प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो.
असेच अनेक प्रसंग शाळेतले! कधीतरी सोबत्यांच्या बरोबर शिक्षकांच्या काढलेल्या खोड्या.... केलेली मस्ती.... एखादी आवडणारी मैत्रीण/ आवडणारा मित्र यांच्याबद्दल दोस्तांमध्ये केलेली चर्चा..... तसं बघितलं तर हे केवळ काही प्रसंग.... पण प्रौढत्वाच्या वळणावर कधीतरी आपला तो शाळेतला जुना वर्ग आठवतो. मग एखाद्या संपर्कातल्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे हे बोललं जातं. कोणीतरी पुढाकार घेतं; आणि परत एकदा तो जुना वर्ग एकत्र येतो. सगळेच मोठे झालेले असतात. आपापल्या आयुष्यात पूर्णपणे अडकलेले असतात. तरीही एकमेकांना बघायला-भेटायला उत्सुक असतात.... आणि मग सोबतीला तेच जुने प्रसंग आठवणींच्या स्वरूपात येतात. शिक्षकांपासून लपवून केलेल्या खोड्या, गृहपाठ केला नाही म्हणून झालेली शिक्षा या तर शाळेला जोडलेल्या आठवणी असतातच पण या वळणावर ते जुने लपवलेले 'क्रश' मोकळेपणी सांगितले जातात. खूप हसतो आपण... खुश होतो... आणि नकळत नवीन आठवणीची पुरचुंडी बांधून घेऊन एकमेकांचा निरोप घेतो.
वाढत्या वयाबरोबर आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत जातात. कधी अचानक आलेले गंभीर प्रसंग, तर कधी अचानक आलेली सुखद बातमी.... प्रत्येक घटना आपल्या मनातल्या तळ्यात आठवणींचे तरंग बनून विरघळत असते. मात्र या आठवणी कुरवाळत बसायला आपल्याकडे वेळ नसतो. तरुण्यातून प्रौढत्वाकडे आपली घोडदौड सुरू असते. वाढत्या संसाराबरोबर वाढत्या जवाबदाऱ्या आणि कर्तव्यांची यादी वाढतच असते. क्षणभराच्या विश्रांतीच्या वेळी काही प्रसंग हलकेच तरंग उठवतात... पण आपण परत मन झटकून पळायला लागतो.
....आणि मग कधीतरी अचानक आपल्याला लक्षात येतं; अरे आपण आता उगाच इतकं धावतो आहोत. आता वेग कमी करायला हरकत नाही. आपण हळू हळू मोकळे होतो आहोत या जवाबदाऱ्यांमधून. हे लक्षात येईपर्यंत आपण वृद्धत्वाकडे झुकायला लागलेले असतो. आता आपल्याकडे वेळच वेळ असतो..... आणि मग आयुष्यभर घडलेले प्रसंग येतात सोबतीला... आठवणींच्या स्वरूपात.
या आठवणी कायम मनात राहातात........... कारण त्या प्रसंगांमध्ये ज्या व्यक्ती आपल्याला सोबत करतात त्या आपल्यासाठी कायमच खास असतात.
माणसाचं मन म्हणजे अनेक भावनांचं, विचार-कल्पनांचं आणि मुख्य म्हणजे अनेक आठवणींचं भांडार असतं. कडू-गोड, दुःखद-आनंदी असे अनेक प्रसंग आपण आपल्याही नकळत आपल्या मनात जपत असतो; आणि कधीतरी काही कारणांनी हेच प्रसंग आठवणींच्या स्वरूपात परत ताजे करतो.
कशी गम्मत असते बघा.... आपल्या वाढत्या वयात आपल्याला आई-वडिलांची मतं कधीकधी पटत नाहीत. मग आपण वाद घालतो... माझं म्हणणं कसं बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी कधी त्यांचा राग येतो; तर कधीतरी त्यांचं पटत. पण तरीही आई-वडिलांनी विषय समजावताना बोललेले शब्द आपल्या मनात घर करतात आणि आपण मनातच म्हणतो;'माझ्या मुलांच्या बाबतीत मी नाही अस वागणार.' दिवस जातात... आपण मोठे होतो... संसार-मुलं अस आयुष्य आपलं देखील सुरू होतं.... कधीतरी असा प्रसंग येतो की आपली वयात येणारी मुलं आपल्याशी वाद घालायला लागतात; आणि नकळत आपण आपल्या आई-वडिलांनी वापरलेले शब्दच वापरतो. वाद मिटतो.... पण ती जुनी आठवण मनाच्या पृष्ठभागावर येते. चूक की बरोबर याच्या पुढे जाऊन मला वाटतं की ती आठवण... तो प्रसंग.... कदाचित त्या वयात आपल्याला फार शिकवत नसेलही. पण पालकत्वाच्या या वळणावर मात्र तोच आठवणीतला प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो.
असेच अनेक प्रसंग शाळेतले! कधीतरी सोबत्यांच्या बरोबर शिक्षकांच्या काढलेल्या खोड्या.... केलेली मस्ती.... एखादी आवडणारी मैत्रीण/ आवडणारा मित्र यांच्याबद्दल दोस्तांमध्ये केलेली चर्चा..... तसं बघितलं तर हे केवळ काही प्रसंग.... पण प्रौढत्वाच्या वळणावर कधीतरी आपला तो शाळेतला जुना वर्ग आठवतो. मग एखाद्या संपर्कातल्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे हे बोललं जातं. कोणीतरी पुढाकार घेतं; आणि परत एकदा तो जुना वर्ग एकत्र येतो. सगळेच मोठे झालेले असतात. आपापल्या आयुष्यात पूर्णपणे अडकलेले असतात. तरीही एकमेकांना बघायला-भेटायला उत्सुक असतात.... आणि मग सोबतीला तेच जुने प्रसंग आठवणींच्या स्वरूपात येतात. शिक्षकांपासून लपवून केलेल्या खोड्या, गृहपाठ केला नाही म्हणून झालेली शिक्षा या तर शाळेला जोडलेल्या आठवणी असतातच पण या वळणावर ते जुने लपवलेले 'क्रश' मोकळेपणी सांगितले जातात. खूप हसतो आपण... खुश होतो... आणि नकळत नवीन आठवणीची पुरचुंडी बांधून घेऊन एकमेकांचा निरोप घेतो.
वाढत्या वयाबरोबर आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत जातात. कधी अचानक आलेले गंभीर प्रसंग, तर कधी अचानक आलेली सुखद बातमी.... प्रत्येक घटना आपल्या मनातल्या तळ्यात आठवणींचे तरंग बनून विरघळत असते. मात्र या आठवणी कुरवाळत बसायला आपल्याकडे वेळ नसतो. तरुण्यातून प्रौढत्वाकडे आपली घोडदौड सुरू असते. वाढत्या संसाराबरोबर वाढत्या जवाबदाऱ्या आणि कर्तव्यांची यादी वाढतच असते. क्षणभराच्या विश्रांतीच्या वेळी काही प्रसंग हलकेच तरंग उठवतात... पण आपण परत मन झटकून पळायला लागतो.
....आणि मग कधीतरी अचानक आपल्याला लक्षात येतं; अरे आपण आता उगाच इतकं धावतो आहोत. आता वेग कमी करायला हरकत नाही. आपण हळू हळू मोकळे होतो आहोत या जवाबदाऱ्यांमधून. हे लक्षात येईपर्यंत आपण वृद्धत्वाकडे झुकायला लागलेले असतो. आता आपल्याकडे वेळच वेळ असतो..... आणि मग आयुष्यभर घडलेले प्रसंग येतात सोबतीला... आठवणींच्या स्वरूपात.
या आठवणी कायम मनात राहातात........... कारण त्या प्रसंगांमध्ये ज्या व्यक्ती आपल्याला सोबत करतात त्या आपल्यासाठी कायमच खास असतात.
स्मृती गन्ध,
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete