Friday, February 15, 2019

भ्याड हल्ल्याच्या शाहिदांनो.... 

काल 14 फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लेथपोराजवळ श्रीनगर-जम्मू महामार्गावर जहालवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांच्या बसला लक्ष्य केलं.

या हल्ल्यात शाहिद झालेल्या आपल्या प्रिय जवानांना हा निरोप......

भ्याड हल्ल्याच्या शाहीदांनो....


आसवांच्या लाटा ना देऊ सोबत...
अग्नीचा दाह घेऊन जा...
भ्याड हल्ल्याच्या शाहिदांनो...
निरोप आमचा घेऊन जा!

म्हणावे त्या अल्लाला...
थोडा धीर धर तुझ्या हृदयी...
पोहचतील नरकात तुझे कैवारी...
धार इतकी आमच्या तलवारी!

बेचिराख करून त्यांचे मनसुबे...
गलितगात्र त्यांना करू आम्ही...
जन्म का घेतला भूतली आम्ही....
प्रश्न विचारतील नरकात पोहोचूनी!

बदला नसे हा; शिक्षा यमसदनाची...
ठोठावली असे त्यांच्या भाळी...
नेस्तनाबूत करू अस्तित्व तयांचे...
हीच श्रद्धांजली तुम्हा शाहिदां चरणी!!!    

7 comments:

  1. U said it jyoti....
    We feel same...

    ReplyDelete
  2. जय जवान करोडो भारतीयांच्या याच भावना आहेत लवकरात लवकर पाकिस्तान घुसुन सर्जिकल स्ट्राईक 2 मोदीजी करा व वीर जवानांना खरी मानवंदना द्या जय हिंद

    ReplyDelete
  3. ह्या भ्याड हल्याचा निषेधच करायला हवा. पाकिस्तान व तेथील दहशतवाद्यांना जरब बसेल असा धडा शिकवायला संधि आहे. परंतु त्याच बरोबर काश्मिरातील जनता मुख्य प्रवाहात येणंदेखील तितकच महत्वाचआहे. त्यासाठी प्रयत्नपूर्व कउपाय करायला हवेत.आजकाल बेजबाबदार वक्तव्य करण्याकडे लोकांचा जो कल दिसतो त्याला लगाम घालणं जरुरीचं वाटतं. नाहितर काश्मिरातील प्रश्न चिघळत राहिल.

    ReplyDelete
  4. अगदी खरं आहे. काश्मिरी तरुणांना नोकरी-व्यवसाय सुरू करण्यास मदत करून त्यांना कामाला लावलं पाहिजे. जेणेकरून रिकामे असल्याने हे तरुण नक्षलवादी कारवायांकडे वळतात ते बंद हपिल.

    मुख्य म्हणजे पाकिस्तान ला धडा शिकवला पाहिजे

    ReplyDelete